........घायाळ वादळही

पुन्हा एकदा आलंच
(येणारच होतं ते).....
गेल्या वेळेस बरीच मोडतोड करून गेलेलं
यंदा पण झालंय बरंचसं नुकसान
कुंपणाच्या तारा गोळा झाल्यात
खांब उखडून पडलेत
(अजुनही बरीच नासधुस झालीये)
आता मात्र पक्का बंदोबस्त करावा लागेल अस दिसतय
सिमेंट्ची पक्की भिंत बांधून घ्यावी
आणि हो वरती फुट्क्या बाट्ल्यांच्या काचा पेरायला हव्यात
म्हणजे नुसतं डोकवायचं म्हणलं तरी घायाळ झालं पाहिजे हे वादळ.
....
(आतलेही होतील घायाळ त्यावरून बाहेर डोकावताना)
चिंता करायची नाहीच काही गरज ,
बंदोबस्त झालाय....

No comments: