Showing posts with label असच. Show all posts
Showing posts with label असच. Show all posts
स्थळ: कर्वे रोडचा सेन्ट्रल मॉल
डिस्काऊंट चा घसघशीत आठवडा
खच्चून गर्दी
आम्हीपण गर्दीत कुठ काय मिळतंय का ? आवडतंय का आपल्याला करत शॉपिंग bag सावरत फिरतोय . स्त्रियांच्या कपडे विभागात अर्थात. पायाशी काहीतरी हालचाल होते म्हणून दचकून खाली बघते मी तर साधारण अडीच-तीन वर्षाच एक पिल्लू मध्ये मध्ये करतय. मी सहज त्याच्याशी बोलते. ते मम्मा म्हणत आईकडे जाऊ लागत. मग. माझी नजर आई-बापाकडे, अगदी तिशीच्या आतलं जोडप शॉपिंगमग्न लेकरू कुठ आहे याच भान नाही, असो म्हणत मी पुढे सरकते.
पुन्हा ती मगाची "मम्मा" हाक ऐकू येते अभावितपणे मी हाकेचा वेध घेत नजर फिरवते. आता तेच ते मगाच लेकरू एक hanger ला अडकवलेला ड्रेस ( बायकांच्या सेक्शन मधला ) घेऊन आईच्या मागे मागे फिरतंय.
आता यात सांगण्यासारख काय आहे खर तर?
पण तो ड्रेस जो ते मुल घेऊन फिरत होत, त्याची उंची अर्थात तो ड्रेस पूर्ण वर धरता येईल एवढी नव्हती.मग तो ड्रेस लोळवत लोळवत एकदा आईच्या मागे मागे एकदा बाबाकडे असा फिरत होत आई बाप पण आपल्याला नाही ना त्रास देत आहे मग करू दे कायपण अशा विचारात त्याला काही म्हणत नव्हते.
नुकसान माझही होत नव्हत तरी मला आपल उगाच "अरे तो नवा ड्रेस आहे, लोळवल्यामुळे तो खराब होतो आहे, खराब झाला तर घेणार नाही कोणी, वगैरे वगैरे बडबडण चालू होत..
असो ...

झिम्माड..झिम्माड

एक जानेवारी वर्षाचा पहिला दिवस आणि शनिवार सगळं कसं जमवून आणल्यासारखं, सगळ्यांनी मिळून बिचवर जायचं ठरलं इथला शारजाहचा समुद्र पाहिला नव्हता अजून म्हटलं चला भेटून येऊया...हो मी समुद्रावर फिरायला जात नाही कधीच त्याला भेटायला जाते असंच वाटतं नेहमीच मला. कारण याच्यासोबत किती वेळ काढला तरी मन भरत नाही, किती तरी गोष्टी सांगतो आम्ही एकमेकांना. तर जेवण वगैरे पॅक करून आम्ही आमच्या शारजाहच्या घराजवळच असलेल्या बिचवर पोचलो. सोसाट्याचा वारा सुटलेला आभाळ भरून आलेलं..गाडितून उतरे उतरेपर्यंत आमची पोरं धूम समुद्राच्या पाण्यात भिजायला पोचली पण. अरे ढग आलेत गार आहे म्हणे पर्यंत भुरभुर सुरु झाली टपोरे थेंब पडायला लागले आणि धो-धो कोसळायलापण लागला.

अरे ही काय वेळ आहे यायची? कधीही काय? ऋतू कुठला वेळ कुठली आणि तुझं आपलं तिसरंच..पळापळी करून गाडीत बसायला आलो तर यानं सगळ्यांनाच चिंब भिजवून टाकलेलं.गम्मत वाटली...
मी आपली मनातच बडबडले

"चल पळ मी समुद्रावर समुद्रात भिजायला आलेय पावसात नाही काही, आत्ता इथे तुझं कोणाला कौतुक? काहीही काय..मला नाही भिजायच पावसात."

पण तू एवढा विचार करायला अवधीसुद्धा दिला नव्हता "झिम्माड झिम्माड"

गाडीतनं उतरून पुन्हा उलटपावली समुद्रावर, पाय बुडेल एवढ्याच पाण्यात गेले सुखावणारा वाट्ला स्पर्श..मग अजून पुढे विजेच्या लखलखाटात याचं आपलं चालुच बघ बघ मी जिंकलो की नाही? मीपण हट्टी समुद्रात डुबकी मारून याला वेडावून दाखवत म्हटलं मी समुद्रातच भिजले होते तुझ्यात नाही काही!!!!!!!!

निरोप..स्वागत

जसा ओलांडला काल
तसा जाईल आजही
नाही उद्याची प्रतीक्षा
तो येईलही जाईलही


आता संपतच आलय वर्ष म्हणल्यावर द्यायचा त्याला निरोप, नाहितरी दुसरं काय हातात असतं आपल्या? वेळेला बांधु शकत नाही आपण केवढं मोठी गोष्ट आहे खरच. असं झालं असतं तर? कित्येक क्षण तसेच थांबवून ठेवले असते आपण पुढे गेलोच नसतो त्या क्षणाच्या. पण मग आज बघायला नसताच मिळाला! मजाच ना खरच तसं झालं असत तर.

वर्ष बदलतात महिने बदलतात पण आपण किती बदलेले असतो?
फार फरक पडलेला नसतो आपल्यामधे लिहिताना तारिख वार आणि उलटलेला काळ लक्षात ठेवायला बरं म्हणुन

लिहीत जातो कशास आपण?

यशोधराच्या ब्लॉगवर, "मी का लिहिते?" या पोस्टला प्रतिसाद देऊन आले. आणि इतरही ब्लॉग्जवरचा हा खो-खो वाचला. वाचून विचारातही पडले, थोडीशी गंमतही वाटली खरंच, आपण का लिहितो? या प्रश्नावर प्रत्येक लिहिणा्-याचे अगदी गंभीर विचार वाचले. नकळत मन विचार करायला लागलं. खरंच का बरं लिहितो आपण? बरंच काही नवीन सापडलंही. या सगळ्या मंडळींमध्ये आपण काय लिहिणार. म्हणून मनातल्या मनातच लिहून, वाचूनही घेतलं स्वतःला. पण मेघनानी प्रतिसाद वाचला आणि लिही तू पण म्हणून खो दिलं. मग घेतलंच लिहायला. गद्य लेखन माझा प्रांत नाही. जे काही लिहिते ते अगदीच थोड्या शब्दात बोलून टाकायची फार वाईट(?) सवय आहे मला. मग का लिहितो हे लिहायला घेतल्यावर मात्र पंचाईत झाली आणि परीक्षा असल्यासारखं वाटायला लागलं. तरीही मी आपलं घोडं दामटावतीये पुढे

स्वतःला व्यक्त करण्याचा सोपा मार्ग. हे अगदी सरधोपट उत्तर आलं माझ्याही मनात. उंहू पण अगदीच एवढं कारण नसणार आपल्या लिहिण्यामागे हेही नक्की जाणवलं. बऱ्याचदा कविता लिहून झाल्यावर जाणवत, अरे हे काय? आणि का लिहिलंय आपण? मिळणाऱ्या प्रतिक्रिया? हे एक कारण आहेका? लोक वाह वा करतात, अहं सुखावला जातो म्हणून? असेलही कदाचित पण सगळ्याच लिखाणाला प्रतिसाद मिळतोच असं नाही मग तरीही लिखाण बंद करत नाहीच आपण. जे जसं सुचेल तसं लिहितंच असतो की. मग मिळणारे प्रतिसाद हे काही कारण नाही.

बऱ्याचदा लिहून झाल्यावर जाणवत, हे काय? खरंच मग असलं नकारात्मक लिहिण्याच काय हशील? पण लिहून मोकळं झाल्यासारखं वाटतं, आपल्या डोक्यावर असलेलं कसलंतरीच ओझं अलगद कोणीतरी काढून आपल्या हातात घ्यावं आणि आपल्याला एकदम मोकळं मोकळं वाटावं तसं काहीतरी. मग या लिखाणाला सकारात्मक उर्जा म्हणून बघायला काय हरकत आहे? मनातले नकारात्मक विचार कागदावर/ब्लॉगवर उरतावल्याने बरं वाटत असेल तर चांगलंच आहे की.

प्रत्येक लिखाणाची कारण वेगवेगळी असतील हे जाणवायला लागलंय आता. मागे औरंगाबाद खाद्ययात्रा लिहिली तेंव्हा, त्या त्या जागांना मनोमन भेटून आले, ते क्षण, तेवढ्यापुरते का होईना जगून घेतले होते. आठवलं. मग लिहिणं म्हणजे उलटून गेलेल्या क्षणांना पुन्हा जगणं असं म्हणता येईल? बरिच कारणं सापडली जे लिहिलंय त्याची आणि जे न लिहूनही उमटलंय त्याचीही.

या प्रश्नाने एक कविता मात्र सुचली,त्यातल्या सुरवातीच्या ओळी अश्या .

"लिहीत जातो कशास आपण?
लढवत राहतो शब्दांचे रण, "

यशोधरा, मेघना आणि इतर सगळ्याच दिग्गज ब्लॉगर्सना या खेळाबद्दल धन्यवाद.

अपेक्षाभंग.....कुणाचाही

ए.टी.एम मधून पैसे काढायला जाते तिथेच बाजुला भली मोठी मशीद आहे. तिथे मशीदिच्या बाहेरच्या पाय-यांवर एक बुरखा घातलेली बाई समोर एक डब्बा घेऊन बसलेली असते. मी आधी कधीच तीच्या डब्यात पैसे घातले नाहीत पण ४-५ महिन्यापूर्वी काय वाटलं कोणास ठाऊक मी थोडे फिल्स तिच्या डब्यात टाकले आणि मग ती सवयच झाली पैसे काढायला गेले की तीच्या डब्यात काही नाणी टाकूनच गाडीत बसायचं.

पण काल तिथे गेले पैसेही काढले आणि सुट्टे नव्हते म्हणून नाही टाकले तीच्या डब्यात पैसे. मी तिथून पुढे सरकत होते तेंव्हा तिने नेहमीच्याच अपेक्षेनं सलाम म्हणून डबा वरती उचलून धरला. माझा हात हालला पण मी नुसताच सलाम म्हणाले आणि पुढे जाऊन गाडीत बसले.

थोडासा रागच आला मला, की काय हे? एकदा दिलं म्हणून काय नेहमिच द्यायला हवं का? आणि नंतर मात्र उगाचच रुखरुख लागून राहिली मनाला. पहिल्याच दिवशी नसते दिले तिला पैसे तर तीचा हा अपेक्षाभंग टाळता आला असता मला.

Happy New Year :)

काय लिहायचय ? काही खास नाही , उगाचच काहितरी.
अंs s काय बर बदल होतो नविन वर्ष सुरु झालं म्हणजे? तसं बघायला गेलं तर काहिच नाही, रोज उगवतो तसाच दिवस आजचाही उगवला सकाळची आता दुपारपण झाली मग एवढा जल्लोष एवढा उत्साह कशासाठी?
नव वर्ष असंही येणारच असतं तुम्हि स्वागत करा नाहितर नका करु. मग हे येणारच आहे आणि जुनं जाणारच आहे तर जाणा-याला हसतमुखानं निरोप आणि येणा-याचं आनंदानी उत्साहानि स्वागत करण हे तरी आपल्या हातात असतच मग का करु नये तसचं. तर Happy New Year लोकहो :)

मागे वळून बघितलं तर , जाणा-या वर्षानि आपल्याला बरंच काहि दिलेलं असतं. आपण बरंच काहि हरवलेलं असतं, पण हे जे हरवलेलं आहे त्यालाच कुरवाळत बसलो तर आपल्या आयुष्यात येणारं अजुन एक वर्ष आपण वाया घालवणार आहोत हे लक्षात घेउन ते तिथेच सोडून त्यातुन काय बोध घ्यायचा तो घेउन नव्या वर्षाला नव्या उमेदिनी नव्या उत्साहानी आणि काय काय मिळालय आपल्याला ह्यावर नजर टाकून केली तर बरं नाहि का?

तर बदलत काहीच नसतं पण अश्या क्षणांनी अश्या प्रसंगांनी आपण होऊन काहितरी बदल घडवून आणायचे असतात. म्हणून मग असली निमित्त शोधायची स्वतःमधे बदल घडवून आणायसाठी. संकल्प वगैरे भानगडी खरोखर न पाळण्यासाठिच असतात. पण अगदि संकल्प असं न म्हणता स्वतःला दिलेलं वचन, स्वतःशीच प्रामाणिक राहायचा प्रयत्न? असं काहिसं म्हणता येइल?
काय काय करायला हवं बरं?

सध्या तरी एवढच म्हणायचय जे रोजही म्हणू शकतो आपण नव्या सुर्याबरोबर रोज नवि सुरवात करावि , कालचं चांगल लक्षात ठेवावं वाईट विसरुन जावं.

आता हे काय नविन हाय का राव? :D काय तरी बडबड करते बया

एक ना धड.........................

एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला की नविन काहीतरी करावं म्हणे! मला हल्ली कवितांचा कंटाळा यायला लागलाय .
मग काय कराव याच उत्तर गेल्या आठवड्यात असच भट्कायला गेलो होतो तिथे छान जवळुन विमानं उतरताना दिसतात. मोबाईलच्या Cam नी फोटु काढायचा प्रयत्न केला , काही छान आले काही बरे आले , मग म्हंटल चला चांगला cam घेउन टाकु या , तशी मी छानच फोटो काढते (इती आमचे बंधुराज, तसं त्याच्या दृश्टीनी मी लिहितेही चांगल:D) तसही वाढदिवस होताच मग नव-याला कापायची एवढी सुवर्णसंधी कोण सोडणारे :D
त्यानी एकदम कौतुकानी विचारल "हं! काय मग काय घ्यायच वाढदिवसाचं" मी जरा सावधपणे "मला ना जरा चांगला digi cam हवाय हो!"
नवरोबा एकदम चाटच आता या बयेला नक्की काय झालय म्हणुन?
साड्या,ड्रेसेस, एवढच नाही तर हि-याचे ,मोत्याचे दागिने हे सगळ सोडून अचानक हे camera घ्यायच खुळ कुठुन डोक्यात आलय?(इथे त्याला माझ्या "सवयीची" किती सवय झालीये हे लक्षात येत ना तेच हो आपलं "एक ना धड भाराभर.........."):D
तो अगदी मला सोन्या राजा करुन समजावायचा प्रयत्न करत होता "आपण अस करु या का? तुला मी पैसे देउन ठेवतो पाहिजे तर पण जरा नंतर घेउ या का cam? ( हे अश्यासाठी की आधिचे ४ camere पडलेत घरात हा पाचवा )
पण मी ऐकेल तर ना !मला cam हवाच होता तो पण मला हवा तसा . शेवटी हो नाही करत ५-६ malls ना भेटी देउन झाल्यावर आणि नव-याचा brain wash करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर, एकदाचा जरा स्वस्तातलाच(माझ्या मते :( मला हवा तसा नाहीच हं आणि) camera घेतला मी.
इथुन पुढे मी काढलेले वेडेवाकडे फोटु पहायची तयारी ठेवा लोकहो.

तर एवढा पोस्ट प्रपंच कशासाठी ,जे या blog ला भेट द्यायला येतात त्यांना सावध करण्यासाठी :P
आता हळव्या कविता, चारोळ्या,गझल हे काही वाचायला मिळायच नाही बहुदा :)
तेंव्हा माझ्या या blog ला पुन्हा भेट द्यायची की नाही ते आधीच ठरवून घ्या म्हणजे झालं.