हट्टी....कविता

ह्या कवितेन जरा तरी
शहाण्यासारखं वागावं
वेळ काळ न बघता
कधीही काय सुचावं...?

विरहात ठीके.....पण
'तो' असतानापण याव?
त्याच्याकडे दुर्लक्ष करुन
काय तुझ्याकडे बघावं?

भलतीच बया विचित्र
केंव्हाही काय सुचते...?
नको नको म्हणल तरी
मनात दंगा करते

नाहीच लीहीणार म्हणलं मी
तर हट्टालाच पेटावं
आपले आपले शब्द घेऊन
गुमान ओळीत जाऊन बसावं

आता तरी लीही ना
म्हणुन लाडीकस विनवावं
आणि बर बाई म्हणुन मीही
मग जरा तीचं ऐकावं...

प्रतिध्वनी

इकडून एक प्रेमळ हाक
तिकडून तेवढीच प्रेमळ साद
मन खुष, मी गोंधळलेली
कोण???
च्च कोण नाय भास....
नाही नाही आहे कोणीतरी..
वेडया प्रतिध्वनी ओळखता येत नाही का?
...
मी बोलत रहाते,
ऐक ना... आज ना... मी तर....
.
.
.
काहितरी का होईना
तिकडून ऐकू येण्यासाठी बोलणं भाग असतं मला.

क्युं खोएं खोएं चांद की फ़िराक मे तलाश मे उदास है दिल

काल इथे दिसणा-या एकमेव मराठी चॅनलवर (मी मराठी) स्वानंद किरकिरेची मुलाखत लागली, मी टी.व्ही. बंद करुन टाकणार होते पण मुलाखत घेणा-यानी कवि,गायक, लेखक अशी ओळख करुन दिल्यावर म्हणल बघु या आहे कोण हा माणूस. आणि बघत म्हणण्यापेक्षा ऐकत राहिले नुसतीच. हि मुलाखत बघेपर्यंत स्वानंद किरकिरे कोण आहे ? मला अजिबात माहिती नव्हतं.
मग मुलाखत संपल्यावर नेट वर शोधत गेले आणि याची एकाहून एक उच्च अशी गाणि सापडत गेली. येऊ घातलेल्या खोया खोया चांद या सिनेमामधलं हे एक अतिशय आवडावच असं गाणं. माझ्यासाठी तरी आता हा सिनेमा कसा असेल? त्याला काहि कथानक असेल का? वगैरे गौण बाबी आहेत. या गाण्यासाठीतरी हा सिनेमा बघायचाच आहे.
गुलजारनंतर आवडणा-या गीतकारामधे स्वानंद किरकिरे नाव कधीच ऍड झालंय हे वेगळ सांगायला नकोच.


आज शब जो चांद ने है रुठने की ठान ली
गर्दिशोमें है सितारे बात हमने मान ली
अंधेरी स्याह जिंदगी को सुझती थी नहि गली
के आज हाथ थाम लो की के हाथ की कमी खली
क्युं खोएं खोएं चांद की फिराक मे तलाश मे उदास है दिल्
क्युं अपने आप से खफा खफा ज़रा ज़रा सा नाराज़ है दिल
ये मंज़िले भी खुद हि तय करें, ये फासलें भी खुद हि तय करें
क्युं तो रास्तों पे फिर सहेम् सहेम् संभल संभल के चलता है ये दिल
क्युं खोएं खोएं चांद की फिराक मे तलाश मे उदास है दिल

ज़िंदगी सवालोंके जवाब ढुंडने चली ,
जवाब में सवालों कि एक लंबी सी लडी मिली
सवाल हि सवाल है सुझती नही गली,
कि आज हाथ थाम लो एक हाथ कि कमि खली
जी मे आता है,
मुर्दा सितारा नोच लू,इधर भी नोच लू
एक दो का जिकर किया मै सारे नोच लू
इधर भी नोच लू, उधर भी नोच लू
सितारे नोच लू , नज़ारे नोच लू
क्युं तू आज इतना वहेशी है, मिजाज़ मे मजाज़ है, ऐ गम-ए-दिल
क्युं अपने आप से खफा खफा, ज़रा ज़रा सा नाराज़ है दिल
ये मंजीले भी खुद हि तय करें, ये फासले भी खुद हि तय करे
क्युं तो रास्तों पे फिर सहेम् सहेम् संभल संभल के चलता है ये दिल

दिल को समझाना केह दो क्या आसान है?
दिल तो फ़ितरत से सुन लो ना बेइमान है
ये खुश नहि है जो मिला, बस मांगता हि है चला
जानता है हर लगि का दर्द हि है बस एक सिला
जब कभि ये दिल लगा, दर्द हि हमे मिला,
दिल कि हर लगि का सुनलो दर्द हि है एक सिला
क्युं नये नये से दर्द कि फ़िराक मे तलाश मे उदास है दिल
क्युं अपने आप से खफ़ा खफ़ा ज़रा ज़रा सा नाराज है दिल
ये मंजीले भी खुद हि तय करे, ये फासले भी खुद हि तय करे
क्युं तो रास्तों पे फिर सहेम् सहेम् संभल संभल के चलता है ये दिल

क्युं खोए खोए चांद कि फिराक मे तलाश मे उदास है दिल
क्युं अपने आप से खफ़ा खफ़ा ज़रा ज़रा सा नाराज़ है दिल

Happy New Year :)

काय लिहायचय ? काही खास नाही , उगाचच काहितरी.
अंs s काय बर बदल होतो नविन वर्ष सुरु झालं म्हणजे? तसं बघायला गेलं तर काहिच नाही, रोज उगवतो तसाच दिवस आजचाही उगवला सकाळची आता दुपारपण झाली मग एवढा जल्लोष एवढा उत्साह कशासाठी?
नव वर्ष असंही येणारच असतं तुम्हि स्वागत करा नाहितर नका करु. मग हे येणारच आहे आणि जुनं जाणारच आहे तर जाणा-याला हसतमुखानं निरोप आणि येणा-याचं आनंदानी उत्साहानि स्वागत करण हे तरी आपल्या हातात असतच मग का करु नये तसचं. तर Happy New Year लोकहो :)

मागे वळून बघितलं तर , जाणा-या वर्षानि आपल्याला बरंच काहि दिलेलं असतं. आपण बरंच काहि हरवलेलं असतं, पण हे जे हरवलेलं आहे त्यालाच कुरवाळत बसलो तर आपल्या आयुष्यात येणारं अजुन एक वर्ष आपण वाया घालवणार आहोत हे लक्षात घेउन ते तिथेच सोडून त्यातुन काय बोध घ्यायचा तो घेउन नव्या वर्षाला नव्या उमेदिनी नव्या उत्साहानी आणि काय काय मिळालय आपल्याला ह्यावर नजर टाकून केली तर बरं नाहि का?

तर बदलत काहीच नसतं पण अश्या क्षणांनी अश्या प्रसंगांनी आपण होऊन काहितरी बदल घडवून आणायचे असतात. म्हणून मग असली निमित्त शोधायची स्वतःमधे बदल घडवून आणायसाठी. संकल्प वगैरे भानगडी खरोखर न पाळण्यासाठिच असतात. पण अगदि संकल्प असं न म्हणता स्वतःला दिलेलं वचन, स्वतःशीच प्रामाणिक राहायचा प्रयत्न? असं काहिसं म्हणता येइल?
काय काय करायला हवं बरं?

सध्या तरी एवढच म्हणायचय जे रोजही म्हणू शकतो आपण नव्या सुर्याबरोबर रोज नवि सुरवात करावि , कालचं चांगल लक्षात ठेवावं वाईट विसरुन जावं.

आता हे काय नविन हाय का राव? :D काय तरी बडबड करते बया