Happy New Year :)

काय लिहायचय ? काही खास नाही , उगाचच काहितरी.
अंs s काय बर बदल होतो नविन वर्ष सुरु झालं म्हणजे? तसं बघायला गेलं तर काहिच नाही, रोज उगवतो तसाच दिवस आजचाही उगवला सकाळची आता दुपारपण झाली मग एवढा जल्लोष एवढा उत्साह कशासाठी?
नव वर्ष असंही येणारच असतं तुम्हि स्वागत करा नाहितर नका करु. मग हे येणारच आहे आणि जुनं जाणारच आहे तर जाणा-याला हसतमुखानं निरोप आणि येणा-याचं आनंदानी उत्साहानि स्वागत करण हे तरी आपल्या हातात असतच मग का करु नये तसचं. तर Happy New Year लोकहो :)

मागे वळून बघितलं तर , जाणा-या वर्षानि आपल्याला बरंच काहि दिलेलं असतं. आपण बरंच काहि हरवलेलं असतं, पण हे जे हरवलेलं आहे त्यालाच कुरवाळत बसलो तर आपल्या आयुष्यात येणारं अजुन एक वर्ष आपण वाया घालवणार आहोत हे लक्षात घेउन ते तिथेच सोडून त्यातुन काय बोध घ्यायचा तो घेउन नव्या वर्षाला नव्या उमेदिनी नव्या उत्साहानी आणि काय काय मिळालय आपल्याला ह्यावर नजर टाकून केली तर बरं नाहि का?

तर बदलत काहीच नसतं पण अश्या क्षणांनी अश्या प्रसंगांनी आपण होऊन काहितरी बदल घडवून आणायचे असतात. म्हणून मग असली निमित्त शोधायची स्वतःमधे बदल घडवून आणायसाठी. संकल्प वगैरे भानगडी खरोखर न पाळण्यासाठिच असतात. पण अगदि संकल्प असं न म्हणता स्वतःला दिलेलं वचन, स्वतःशीच प्रामाणिक राहायचा प्रयत्न? असं काहिसं म्हणता येइल?
काय काय करायला हवं बरं?

सध्या तरी एवढच म्हणायचय जे रोजही म्हणू शकतो आपण नव्या सुर्याबरोबर रोज नवि सुरवात करावि , कालचं चांगल लक्षात ठेवावं वाईट विसरुन जावं.

आता हे काय नविन हाय का राव? :D काय तरी बडबड करते बया

No comments: