पुन्हा नव्याने

लिखाणात अक्षम्य खंड पडला आहे. कविता नाही गाणी नाहीत साधी चारोळी किंवा बाकी इतर बडबड सुद्धा नाही. काल शेजारच्या  काका काकुंशी बोलताना पुन्हा जाणावल, लिहायचं तर  लिहाव आपल्यालाच लागणार  आहे, दुसर कोणी लिहील तर त्याचा फायदा आपल्याला  कसा  होईल ? लिहिण्याचा रियाज हा कधी माझा फार आवडता वाक्यप्रयोग होता. मी अगदीच निष्काळजीपणे जो सोडून दिला होता.

दरवर्षी एक जानेवारीला अतिउत्साहानी  काहीतरी संकल्प करायचा आणि जानेवारी संपता संपता आरंभशूरतेच्या  किश्यामध्ये भर टाकायची या कारणासाठी संकल्प करणंही बंद करून टाकल होत, ठरवण बंद, वाचन बंद चर्चा बंद  एकूण काय सगळच बंद.

अजून एक जानेवारीला दोन दिवस बाकी आहेत खर पण तरी मी आजच हे इथे लिहिते आहे ,  हे लिखाण संकल्पाच म्हणता येईल  पण तसलं काही लेबल मला आज या लेखनाला लावायचं नाहीये.
आत्ता ठरवलं आणि लगेच इथे लिहिते आहे.

तर नव्यानी वाचनासाठी आणि  लिखाणासाठी माझ्या मलाच शुभेच्छा.

खूप लिहिणार आहे , रोज लिहिणार आहे.

आमेन


2 comments:

writetopaint said...

As I said earlier, expressing yourself is more important. Don't feel burdened if you haven't written for some time. Many renowned writers go in to a 'writers' block', me included. Writing isn't mechanical as you know, it stems out of the urge to express.

Kamini Phadnis Kembhavi said...

Writing isn't mechanical as you know, it stems out of the urge to express.>>> could not agree more. thank you once again