काहि अनुत्तरीत प्रश्णांना
काळावर सोपवून दिलेलं असतं ब-याचदा
मग तेही एखाद्या सन्यस्तासारखी समाधी घेउन बसून राहतात
मनाच्या तळघरात,
वरकरणी आपणही सोडुन दिलेला असतो नाद,
अन अचानक,
डायरीतल्या आवडत्या पानात दडपुन ठेवलेलं
जाळी पडलेलं नाजुक पिंपळपान सापडावं तसं....
त्या प्रश्णाच उत्तर अलगद सापडलेलं असत आपल्याला
......आपल्याही नकळत.
वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा
दोन रात्रितील आता संपला वेडेपणा
वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा
वाजली वेडी कडी अन दार हे शहाण्यापरी
मोगरा माळुन आला देखणा वेडेपणा
उंबरा ओलांडताना धिट हे झाले धुके
हि धिटाई झेलताना लाजला वेडेपणा
अजुन मजला कळत नाही वेड कोणी लावले?
वेड मज हा लावणारा कोणता वेडेपणा.
कवि:-प्रविण दवणे
समुद्र
तसा माझ्यावर परिणाम होऊ देत नाहीच मी वादळांचा,
कित्येक येतात आणि जातात ,
तुझ्यासारख एखादच माझ्या अथांगतेला भेदत;
बेभान,बेफाम,सगळ पणाला लाऊन माझ्यात सामाऊन जाणारं,
मग काही वेळासाठी कळत नाही जगाला,
कोण मी आणि कोण तू,
तुझ्यातला आवेग निवल्यावर
तू तुझ्या वाटेनी आणि मी..........
तीथेच होतो तिथेच,
थोडासा शांत थोडासा अस्वस्थ,थोडा उध्वस्त
काहि वेळासाठी का होईना, होतो परिणाम माझ्यावरहि
आकाश
कायम शांत निवांत असलेलं;
दुरुनच जगाच निरीक्षण करणारं,
याच्यार्यंत वादळबिदळ पोचतच नसणार बहुदा
आणि आलंच वादळ तर भीक न घालणारं
तेच बरय;
वादळाला शांत राहता येत नसतच म्हणा कधीही
आकाशानं शांतच राहायला हवं?
चारोळी
जेंव्हा जेंव्हा ठरवावं
लिहू नये काही,
तेंव्हा अजूनच गहिरी
होऊन पाझरते शाई!!!
Subscribe to:
Posts (Atom)