यशोधरानी दिलेला खो पुढे चालवत आवडती एक(च) कविता पोस्ट करतिये, जाचकच आहे हा नियम पण तसं म्हटल तर अक्ख पान भरेल आणि मन भरणार नाही. असो.
************************************************************************************
१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा
२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)
३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा
४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही
५. अजून नियम नाहीत :)
**********
असेच हे
असेच हे कसेबसे
कसेतरी जगायचे
कुठेतरी..कधीतरी
असायचे,नसायचे
असेच सोससोसता
हसून हासवायचे
असेच हासहासता
हळूच विव्हळायचे
असाच राहणार मी
जिता तुरुंग आपुला
अशाच बाळगीन मी
सुटावयास शृंखला
असाच हा गिळायचा
गळ्यामधील हुंदका
कसेबसे तगायचे
धरून धीर पोरका
अशीच येथली दया
हवीत चाचपायची
अशीच जीवनास ह्या
पुन्हा क्षमा करायची
असाच श्वास तोकडा
पुन्हा पुन्हा धरायचा
असाच जन्म फाटका
पुन्हा पुन्हा शिवायचा
सुरेश भट.
माझा खो जयुला http://maajhime.blogspot.com/
कोलाज
तुकड्या तुकड्यात विखुरलेलं अस्तित्व
गोळा करून उभं करावं स्वतःला,
म्हणून जोडत गेले एकेक ;
जुळतंही गेला प्रत्येक तुकडा.
नकळत मनानं पावती दिली
सुंदरच जमलंय...कोलाज!
गोळा करून उभं करावं स्वतःला,
म्हणून जोडत गेले एकेक ;
जुळतंही गेला प्रत्येक तुकडा.
नकळत मनानं पावती दिली
सुंदरच जमलंय...कोलाज!
लिहीत जातो कशास आपण?
ही कविता सुचण्याला कारण, मेघनाचा खो :) धन्यवाद मेघना
लिहीत जातो कशास आपण?
लढवत बसतो शब्दांचे रण
शब्द पाहावा शब्दच गावा
शब्दातच जिवलगही दिसावा
कधी भासते लिहिणे मृगजळ
कधी ठसठसे जखमच केवळ
लिहून टाकू, होउ मोकळे
कळून येते जडावलेपण
कधी लांबते कधी थांबते
शब्दांचे हे अवघडलेपण
शब्दच कुंपण शब्दच शिंपण
शब्दच हरिमुरलीचे गुंजन
शब्दच तारा शब्दच वारा
काजळरात्री शब्द सहारा!
लिहीत जातो कशास आपण?
लढवत बसतो शब्दांचे रण
शब्द पाहावा शब्दच गावा
शब्दातच जिवलगही दिसावा
कधी भासते लिहिणे मृगजळ
कधी ठसठसे जखमच केवळ
लिहून टाकू, होउ मोकळे
कळून येते जडावलेपण
कधी लांबते कधी थांबते
शब्दांचे हे अवघडलेपण
शब्दच कुंपण शब्दच शिंपण
शब्दच हरिमुरलीचे गुंजन
शब्दच तारा शब्दच वारा
काजळरात्री शब्द सहारा!
लिहीत जातो कशास आपण?
यशोधराच्या ब्लॉगवर, "मी का लिहिते?" या पोस्टला प्रतिसाद देऊन आले. आणि इतरही ब्लॉग्जवरचा हा खो-खो वाचला. वाचून विचारातही पडले, थोडीशी गंमतही वाटली खरंच, आपण का लिहितो? या प्रश्नावर प्रत्येक लिहिणा्-याचे अगदी गंभीर विचार वाचले. नकळत मन विचार करायला लागलं. खरंच का बरं लिहितो आपण? बरंच काही नवीन सापडलंही. या सगळ्या मंडळींमध्ये आपण काय लिहिणार. म्हणून मनातल्या मनातच लिहून, वाचूनही घेतलं स्वतःला. पण मेघनानी प्रतिसाद वाचला आणि लिही तू पण म्हणून खो दिलं. मग घेतलंच लिहायला. गद्य लेखन माझा प्रांत नाही. जे काही लिहिते ते अगदीच थोड्या शब्दात बोलून टाकायची फार वाईट(?) सवय आहे मला. मग का लिहितो हे लिहायला घेतल्यावर मात्र पंचाईत झाली आणि परीक्षा असल्यासारखं वाटायला लागलं. तरीही मी आपलं घोडं दामटावतीये पुढे
स्वतःला व्यक्त करण्याचा सोपा मार्ग. हे अगदी सरधोपट उत्तर आलं माझ्याही मनात. उंहू पण अगदीच एवढं कारण नसणार आपल्या लिहिण्यामागे हेही नक्की जाणवलं. बऱ्याचदा कविता लिहून झाल्यावर जाणवत, अरे हे काय? आणि का लिहिलंय आपण? मिळणाऱ्या प्रतिक्रिया? हे एक कारण आहेका? लोक वाह वा करतात, अहं सुखावला जातो म्हणून? असेलही कदाचित पण सगळ्याच लिखाणाला प्रतिसाद मिळतोच असं नाही मग तरीही लिखाण बंद करत नाहीच आपण. जे जसं सुचेल तसं लिहितंच असतो की. मग मिळणारे प्रतिसाद हे काही कारण नाही.
बऱ्याचदा लिहून झाल्यावर जाणवत, हे काय? खरंच मग असलं नकारात्मक लिहिण्याच काय हशील? पण लिहून मोकळं झाल्यासारखं वाटतं, आपल्या डोक्यावर असलेलं कसलंतरीच ओझं अलगद कोणीतरी काढून आपल्या हातात घ्यावं आणि आपल्याला एकदम मोकळं मोकळं वाटावं तसं काहीतरी. मग या लिखाणाला सकारात्मक उर्जा म्हणून बघायला काय हरकत आहे? मनातले नकारात्मक विचार कागदावर/ब्लॉगवर उरतावल्याने बरं वाटत असेल तर चांगलंच आहे की.
प्रत्येक लिखाणाची कारण वेगवेगळी असतील हे जाणवायला लागलंय आता. मागे औरंगाबाद खाद्ययात्रा लिहिली तेंव्हा, त्या त्या जागांना मनोमन भेटून आले, ते क्षण, तेवढ्यापुरते का होईना जगून घेतले होते. आठवलं. मग लिहिणं म्हणजे उलटून गेलेल्या क्षणांना पुन्हा जगणं असं म्हणता येईल? बरिच कारणं सापडली जे लिहिलंय त्याची आणि जे न लिहूनही उमटलंय त्याचीही.
या प्रश्नाने एक कविता मात्र सुचली,त्यातल्या सुरवातीच्या ओळी अश्या .
"लिहीत जातो कशास आपण?
लढवत राहतो शब्दांचे रण, "
यशोधरा, मेघना आणि इतर सगळ्याच दिग्गज ब्लॉगर्सना या खेळाबद्दल धन्यवाद.
स्वतःला व्यक्त करण्याचा सोपा मार्ग. हे अगदी सरधोपट उत्तर आलं माझ्याही मनात. उंहू पण अगदीच एवढं कारण नसणार आपल्या लिहिण्यामागे हेही नक्की जाणवलं. बऱ्याचदा कविता लिहून झाल्यावर जाणवत, अरे हे काय? आणि का लिहिलंय आपण? मिळणाऱ्या प्रतिक्रिया? हे एक कारण आहेका? लोक वाह वा करतात, अहं सुखावला जातो म्हणून? असेलही कदाचित पण सगळ्याच लिखाणाला प्रतिसाद मिळतोच असं नाही मग तरीही लिखाण बंद करत नाहीच आपण. जे जसं सुचेल तसं लिहितंच असतो की. मग मिळणारे प्रतिसाद हे काही कारण नाही.
बऱ्याचदा लिहून झाल्यावर जाणवत, हे काय? खरंच मग असलं नकारात्मक लिहिण्याच काय हशील? पण लिहून मोकळं झाल्यासारखं वाटतं, आपल्या डोक्यावर असलेलं कसलंतरीच ओझं अलगद कोणीतरी काढून आपल्या हातात घ्यावं आणि आपल्याला एकदम मोकळं मोकळं वाटावं तसं काहीतरी. मग या लिखाणाला सकारात्मक उर्जा म्हणून बघायला काय हरकत आहे? मनातले नकारात्मक विचार कागदावर/ब्लॉगवर उरतावल्याने बरं वाटत असेल तर चांगलंच आहे की.
प्रत्येक लिखाणाची कारण वेगवेगळी असतील हे जाणवायला लागलंय आता. मागे औरंगाबाद खाद्ययात्रा लिहिली तेंव्हा, त्या त्या जागांना मनोमन भेटून आले, ते क्षण, तेवढ्यापुरते का होईना जगून घेतले होते. आठवलं. मग लिहिणं म्हणजे उलटून गेलेल्या क्षणांना पुन्हा जगणं असं म्हणता येईल? बरिच कारणं सापडली जे लिहिलंय त्याची आणि जे न लिहूनही उमटलंय त्याचीही.
या प्रश्नाने एक कविता मात्र सुचली,त्यातल्या सुरवातीच्या ओळी अश्या .
"लिहीत जातो कशास आपण?
लढवत राहतो शब्दांचे रण, "
यशोधरा, मेघना आणि इतर सगळ्याच दिग्गज ब्लॉगर्सना या खेळाबद्दल धन्यवाद.
अपेक्षाभंग.....कुणाचाही
ए.टी.एम मधून पैसे काढायला जाते तिथेच बाजुला भली मोठी मशीद आहे. तिथे मशीदिच्या बाहेरच्या पाय-यांवर एक बुरखा घातलेली बाई समोर एक डब्बा घेऊन बसलेली असते. मी आधी कधीच तीच्या डब्यात पैसे घातले नाहीत पण ४-५ महिन्यापूर्वी काय वाटलं कोणास ठाऊक मी थोडे फिल्स तिच्या डब्यात टाकले आणि मग ती सवयच झाली पैसे काढायला गेले की तीच्या डब्यात काही नाणी टाकूनच गाडीत बसायचं.
पण काल तिथे गेले पैसेही काढले आणि सुट्टे नव्हते म्हणून नाही टाकले तीच्या डब्यात पैसे. मी तिथून पुढे सरकत होते तेंव्हा तिने नेहमीच्याच अपेक्षेनं सलाम म्हणून डबा वरती उचलून धरला. माझा हात हालला पण मी नुसताच सलाम म्हणाले आणि पुढे जाऊन गाडीत बसले.
थोडासा रागच आला मला, की काय हे? एकदा दिलं म्हणून काय नेहमिच द्यायला हवं का? आणि नंतर मात्र उगाचच रुखरुख लागून राहिली मनाला. पहिल्याच दिवशी नसते दिले तिला पैसे तर तीचा हा अपेक्षाभंग टाळता आला असता मला.
पण काल तिथे गेले पैसेही काढले आणि सुट्टे नव्हते म्हणून नाही टाकले तीच्या डब्यात पैसे. मी तिथून पुढे सरकत होते तेंव्हा तिने नेहमीच्याच अपेक्षेनं सलाम म्हणून डबा वरती उचलून धरला. माझा हात हालला पण मी नुसताच सलाम म्हणाले आणि पुढे जाऊन गाडीत बसले.
थोडासा रागच आला मला, की काय हे? एकदा दिलं म्हणून काय नेहमिच द्यायला हवं का? आणि नंतर मात्र उगाचच रुखरुख लागून राहिली मनाला. पहिल्याच दिवशी नसते दिले तिला पैसे तर तीचा हा अपेक्षाभंग टाळता आला असता मला.
Subscribe to:
Posts (Atom)