उत्तर

काहि अनुत्तरीत प्रश्णांना
काळावर सोपवून दिलेलं असतं ब-याचदा
मग तेही एखाद्या सन्यस्तासारखी समाधी घेउन बसून राहतात
मनाच्या तळघरात,
वरकरणी आपणही सोडुन दिलेला असतो नाद,
अन अचानक,
डायरीतल्या आवडत्या पानात दडपुन ठेवलेलं
जाळी पडलेलं नाजुक पिंपळपान सापडावं तसं....
त्या प्रश्णाच उत्तर अलगद सापडलेलं असत आपल्याला
......आपल्याही नकळत.

2 comments:

HAREKRISHNAJI said...

होत अस कधी कधी.

Kamini Phadnis Kembhavi said...

अभिप्रायाबद्दल धन्यवाद